मला अजून अमुक करायचे आहे, ही कल्पना साेडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालाे, आता मला काही करायचे राहिले नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. ‘हे परमेश्वरा, आता तुझ्याकरताच मी जगेन, तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही,’ असा निश्चय केला, तर मनाला समाधान झालेच पाहिजे.नामस्मरण हाेत नाही, कारण वयामुळे मन थकले,’ हे म्हणणे बराेबर नाही. शरीर थकेल, कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे, हा शरीराचा निसर्गक्रमच आहे; परंतु मन थकले हे मात्र संयुक्तिक नाही. मन हा परमेश्वराचा अंश आहे, असे आपली दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितले आहे.मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्युसमयीची; परंतु त्या समयीही माझे स्मरण ठेवावे, असे भगवंतांनी सांगितले असताना, त्यापूर्वी केव्हाही, मन थकले आणि स्मरण करू शकत नाही, असे हाेणे शक्य नाही.
पूर्वी सहा-सहा तास बसून जप केलेला असेल, तितका आता हाेत नसेल, मध्ये-मध्ये झाेप लागत असेल, हे मान्य आहे; पण स्मरण राहू शकत नाही, असे नाही हाेणार. मन थकले ही खरी अडचण नसून,मनाचा इतर व्याप ार आहे, हे खरे कारण आहे. सर्व व्यापांतून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूरीचे आहे.पैसाअडका, प्रपंचातल्या सर्व गाेष्टी यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला, तर कार्यभाग निश्चित हाेताे हे मी खात्रीने सांगेन.देहाची स्थिति। कायम न राहे निश्चित। ते सांभाळणे आहे जरूर। न विसरता रघुवीर।। रामा तुझ्याकरिता राहिलाे। हा भाव ठेवावा निश्चिती। शक्य ताे स्मरावा रघुपति।। नामाची धरावी कास। देहादिक प्रपंचात व्हावे उदास। हे सर्व साधे राखता अनुसंधान।।
आता करण्याचे उरले काही। हे किंचितही न आणावे मनी।। मनाने व्हावे रामार्पण। सर्व सत्कर्म- साधनाचा कळस जाणŸ।। धर्माचरण, भगवद्भक्ती, नामस्मरण, सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय हाेत. किंवा एकाच शब्दात असे म्हणता येईल, की सत्संग हाच याला ताेडगा आहे.चित्तशुद्धीचे लक्षण हे आहे की, आपल्यासारखेच सर्व जग सुखी असावे ही भावना असणे. ही भावना वाढण्यासाठी, ‘सर्व जग सुखी असावे’ अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा, म्हणजे हळूहळू भगवत्कृपेने साधेल.अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे, आणि ताे केव्हा डाेके वर काढील आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही, पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवू या आणि आनंदाने राहू या.