काेणतेही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावे; म्हणजे किडलेले किंवा सडलेले नसावे.भगवंताशिवाय दुसऱ्या काेणत्याही फळाच्या हेतूने, केलेली भक्ती ही सडलेल्या बीजासारखी आहे.आता, सुरुवातीलाच उत्तम बी पैदा हाेईल असे नाही; परंतु प्रयत्नाने ते साधता येते.पुष्कळ वेळा काही तरी ऐहिक सुखाच्या इच्छेने मनुष्य भक्ती करायला लागताे; म्हणजे त्या वेळी ताे सडके बी पेरीत असताे. प्रारंभी अशा तऱ्हेचे काही तरी निमित्त हाेतच असते; परंतु थाेड्याशा विचाराने शुद्ध बीजाची पेरणी हाेणे जरुर आहे, असे चित्ताला पटते.तशी भगवंताची अनन्यभावाने प्रार्थना करावी. पाऊस पडणे वा न पडणे ही गाेष्ट सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन आहे आणि ताे यथाकाळ पाडताेही.
असे पाहा की, एखादे शेत खाेलात असले की, त्यात पाणी इतके साचते की, ते जर बाहेर काढून लावले नाही, तर सबंध पीक कुजून जाते. त्याच अर्थाने भगवंताच्या कृपेचा लाेंढा जर जाेराचा असला, तर बंधारा ाेडून ताे बाहेर साेडणेच जरूरीचे असते. असे करण्यात दाेन्हींकडून ायदा असताे. एक म्हणजे, शेतात जास्तझालेले पाणी बाहेर काढून लावल्याने शेतातले पीक न कुजता शेत उत्तम वाढते आणि दुसरे म्हणजे, हे बाहेर घालवलेले पाणी आजूबाजूच्या शेतात पसरून तिथलेही पीक वाढवायला मदत हाेते. बंधारा ाेडून पाणी बाहेर लावणे याचेच नाव ‘पराेपकार.’ साधकाची जशी प्रगती हाेत जाईल, त्याप्रमाणे म ध्यंतरी सिद्धी प्राप्त हाेऊन, बाेललेले खरे हाेणे, दुसऱ्याच्या मनातले समजणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अदृश्य गतीने जाणे इत्यादी प्रकार घडू लागतात.
अशा वेळी माेहाला बळी न पडता त्यांचा उपयाेग स्वार्थाकडे न हाेईल, अशी खबरदारी घेणे जरुर असते आणि उपयाेग करायचाच झाला, तर दुसऱ्याचे काम करण्यात, पराेपकारात व्हावा; यालाच बांध ाेडून पाणी बाहेर लावणे, असे म्हणता येईल.‘भगवंत आहे’ असे आपल्याला म्हणता येत नाही, कारण आपण तसे वागत नाही आणि ‘भगवंत नाही’ असेही आपल्याला म्हणता येत नाही, कारण ताे आहेच आहे. ती शक्ती आणि युक्ती वेळेवर उपयाेजिली पाहिजे. भगवंताच्या इच्छेने सर्व चालले आहे, ही भावना ठेवून, जे येईल त्याला नकाे म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये, अखंड भगवंताच्या स्मरणात राहावे.