परमार्थ पूर्ण समजून आणि श्रद्धेने करावा

    27-Mar-2023
Total Views |
 
 

Gondavlekar 
 
आपण मनुष्य जन्माला आलाे ते भगवंतप्राप्तीकरताच आलाे. आत्तांपर्यंत मी पुष्कळ याेनि हिंडलाे, भगवंताने आता मनुष्ययाेनीत आणले. ‘भगवंता, आता नाही तुला विसरणार’असे कबूल करूनही, आपण जन्मास आलाे नाही तर लगेच ‘तू काेण ?’असे म्हणू लागताे! संत आपल्याला ‘ताेच मी’ असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुन: ताेंडावरून पांघरूण ओढून घेताे, याला काय करावे? झाेपेचे साेंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच जाते.पुष्कळ तीर्थयात्रा केल्या, पण हाेताे तसाच राहिलाे, यात दाेष गंगेचा का माझा? ‘गंगेच्या काठी कितीतरी लाेक येतात, स्नान करतात, पूजाअर्चा करतात, मग हे कलियुग आहे असे कसे म्हणावे?’ असे एकाने म्हटले.
 
त्यावर दुसरा म्हणाला, ‘याचे प्रत्यंतर समाेरच दाखवताे. समाेर एक रक्तपिती माणूस बसला आहे, त्याला जाे पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपिती जाईल. पण एवढे हाेईल की, जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती हाेईल.’ असे समजल्यावर जाे ताे हळूहळू तिथून पसार हाेऊ लागला ! म्हणजे, एवढे नेमनिष्ठ विद्वान गंगामाईचे राेज स्नान करणारे, तरी आपले अंतरंग शुद्ध झाले असे त्या कुणालाच वाटले नाही! तेवढ्यात बऱ्हाडकडला एक गरीब शेतकरी घाेंगडी पांघरून, हातातली काठी टेकीत टेकीत येत हाेता.त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केले की सर्व पापे नष्ट हाेतात. त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या राेग्याला कडकडून भेटला; आणि आश्चर्य म्हणजे त्या राेग्याचा राेग एकदम बरा झाला! असे हे जे गाेरगरीब-भाेळेभाळे लाेक, त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते ते माेठ्या विद्वानांनाही साधत नाही.
 
आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवताे.घरून कचेरीला निघतांना वेळेवर आपण पाेहाेचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच. कधी कधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पाेचूही शकत नाही; तरीपण आपण भरवसा ठेवताेच! व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवताे तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल.परमार्थ पूर्ण समजून तरी करावा, किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने करावा; पण आपण आहाेत अर्धवट; म्हणजे, पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहेअसे वाटते. अशा माणसाला शंका ार, आणि त्याचे समाधान करणेही ार कठीण जाते.अमुक एक खरे आहे असे कळूनसुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही ताे मनुष्य खरा अज्ञानी. जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले!