आपण रामाचे झालाे म्हणजे आपली काळजी त्याला लागते.आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच. आवडच मुळी आपण विषयाची आणि लाैकिकाची ठेवताे.साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते.नाेकरीच्या वेळेस आम्ही बायकामुलांना बाजूला सारून कामावर जाताेच ना! मग साधनाच्या वेळी बायकामुले आड येतात हे का कारण सांगावे? बायका आणि पैका या दाेन गाेष्टी आमच्या आड येत असतात असे आजवर अनेक संतांनी सांगितले. मग या निर्माण तरी का केल्या असे काेणी विचारतील. त्याला उत्तर म्हणजे, काड्याच्या पेटीने विस्तवही पेटविता येताे आणि घरही जाळता येते; त्याचा जसा आपण उपयाेग करावा तसा ताे हाेताे.खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही.
एकजण मला म्हणाला की, ‘मला प्रपंच टाकावासा वाटताे,’ मी त्याला म्हटले, ‘नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसे येईल? वैराग्याला नेहमी विवेकाची जाेड लागते. तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झाले.’ चांगले कर्म आड येत नाही असे थाेडेच आहे ! वाईट कर्म कुणाला सांगण्याची तरी आपल्याललाज वाटते, पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटताे.‘मागील जन्मी पाप केले हाेते म्हणून या जन्मी हे भाेगताे’ असे म्हणताे; आणि ‘आत चांगली कर्मे करताे म्हणजे पुढल्या जन्मी सुख लागेल’ असे म्हणताे, म्हणजे जन्ममरणाच्या ेऱ्यांतून सुटण्याऐवजी त्याच्यात गुंडाळले जाण्यासारखेच झाले! दुष्कर्मामुळे पश्चात्ताप हाेऊन एकदा तरी भगवंताची आठव हाेईल, परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन साेडील त्याचा पत्ता लागणार नाही.
राजासुद्धा याेग्य मार्ग दाखविण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवताे. भगवंताने उद्धवालाही ‘सत्समागम कर’ म्हणून सांगावे, याहून अधिक काय पाहिजे? कडू कारले खाल्ले तर कडूपणाचीच प्रचिती येते, मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गाेड कसे हाेईल? ‘प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करीन’ असे म्हणून नये. विषयासाठी आपण मरमर काम करताे आणि तेवढे करूनही सुख लाभत नाही, मग भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेडेपणाचे आहे! लग्नाआधी मुलीला दहापाच जणांना दाखविली तरी, लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यांतला एकच नवरा असताे आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही, त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालाे, म्हणजे त्याच्याशी लग्न लावले, म्हणजे मग विषयांचे प्रेम कुठे आले ?