ज्याने मन आणि इंद्रियांबराेबर सर्व देहावर ताबा मिळवला आहे, ज्याला काेणतीही वासना नाही, ज्याने कसलाही संग्रह केलेला नाही, अशा याेग्याने एकान्त स्थानी जाऊन आत्म्याला परमेश्वराच्या ध्यानात मग्न करणे याेग्य हाेय.या ठिकाणी कृष्णाने ज्या दाेन-तीन गाेष्टी सांगितल्या आहेत त्या माेठ्या विपरीत आहेत असं वाटेल आणि अशा सूत्रांवर माेठी चुकीची भाष्यं केली गेली आहेत. सरळ अर्थ घेत गेलाे तर समजलं आहे असं वाटत राहतं, म्हणून चूक हाेणं अगदी स्वाभाविक आहे.कृष्ण असे म्हणताे, त्याला कशाची आशा नसते, त्याला कसला संग्रहही करायचा नसताे.अशा समत्वाला उपलब्ध असलेल्या याेग्याने परमात्म्याचे स्मरण करावे, परमसत्तेच्या दिशेने गती करावी.
‘एकांतात’-तेव्हा या सूत्राचे चुकीचे अर्थ लावणं खूप साेपं झालं. अर्जुन हेच तर म्हणताेय, ‘कृष्णा मला येथून, युद्धातून निघू जाऊ दे, वनात एकांतात, चिंतन-मनन करू दे, प्रभू-स्मरण करू दे, जाऊ दे मला,’ कृष्ण त्याला का अडवित आहे? पुन: पुन्हा युद्धाेन्मुख का करीत आहे? कर्माेन्मुख का करीत आहे? तू कर्म करीत रहा, सम हाे, समत्वाला उपलब्ध हाे, पण कर्मात रममाण हाेऊन जीवन जग.
असं कृष्ण का म्हणताे आहे? कृष्णाच्या ‘एकांता’चा अर्थ समजावून घेतला पाहिजे.एकांताचा अर्थ एकटेपणा नव्हे वा आयसाेलेशन नव्हे. एकांताचा अर्थ आहे, स्वत:मध्ये असणे, परनिर्भर नसणे. इतर माणसांची गैरहजेरी म्हणजे एकांत नव्हे.