एखाद्यावर राग काढायचा असेल किंवा एखाद्याचा बदला घ्यायचा असेल, तर घाई करू नका. उलट अशावेळी एखाद्याज्याेतिष्याकडे जा आणि त्याला सांगा की, ‘मला रागवायचे आहे, एका माणसाचा बदला घ्यायचा आहे. यासाठी मला एखादा मुहूर्त काढून द्या. तुम्ही जर शुभकार्यासाठी मुहूर्त काढून देता तर मग अशुभ कार्य मुहूर्ताविना कशी काय घडू देता ?’ राग व्यक्त करण्यासाठी पुष्यनक्षत्रातला अमृत याेग हा मुहूर्त सर्वांत चांगला आहे; पण हा मुहूर्त वर्षातून फक्त दाेनदाच येताे. आता बाेला तुमचा काय विचार आहे ?