अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असताे. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांच्यासारखे असतात ते आपण हाेऊन येतात, आणि आपले काम झाले की जातात; मग ते राहात नाहीत. संतांनी जगातली राज्ये मिळविली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. चमत्कार करणे हे संतलक्षण नव्हे. चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करीत नाहीत. उलट, प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवितात आणि वागून दाखवितात. संतांची निंदा किंवा अपमान करू नये. त्यांची परीक्षाही पाहू नये. सद्विचार ही एक सत्संगतच आहे.काेणाचेही वाईट चिंतू नये. दुसऱ्याचे हित करावे, हितच चिंतावे. उत्तम हित नामावाचून अन्य कशातही नाही.
म्हणून अखंड भगवन्नाम जपणे ही संतसंगतच आहे. ध्यान, स्मरण, मनन आणि सद्ग्रंथवाचन यांमुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम हाेणे हे शक्य हाेईल. संतसमागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही. एकुलत्या एका मुलानं अूच्या गाेळीसाठी हट्ट धरला, तर आई त्याला ती गाेळी देईल का ? जर तिने ती दिली तर आई खरी नव्हेच. त्याप्रमाणे, जाे विषयाचे प्रेम देईल ताे खरा संत नव्हे. संताला विषयाचे प्रेम असत नाही इतकेच नव्हे तरत्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडताे. कुत्रा हाड, चघळीत असतातना आपल्याच ताेंडातले रक्त पिऊन ते त्या हाडातून येते आहे असे समजताे. आणि शेवटी त्यातच मरताे; हे पाहून जितके वाईट वाटेल त्याच्या दसपट, नव्हे अनेकपट, आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते.
संतांनी खरे भगवंताला जाणले. जिज्ञासू शिष्य भेटला तर आपले सार्थक झाले असे वाटते. साधनांनी जे साधत नाही ते संताच्या सहवासात राहिल्याने साधते. मनुष्य जितका निःस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते.तुमच्या-आमच्या घरातले लाेकसुद्धा आपले ऐकत नाहीत, पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते, कारण ती सर्वव्यापक असते. ती अत्यंत तळमळीची असते.याच अर्थाने श्रुति सनातन आहे. जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषि बाेलले, म्हणून त्या वाणीने जगाची कल्याण व्हायचेच; आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटते ताेपर्यंत ती वाणी रहायचीच. आहे त्यात समाधान मानणे, काेणाचाही द्वेष-मत्सर न करणे, सर्व भगवद्रूप मानणे, निरभिमान राहणे, सदाेदित भगवन्नामस्मरण करणे, आणि संत-सज्जन-सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे या गाेष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ. यात काेणची अवघड किंवा खर्चाची आहे? आम्ही निश्चयाने ती करीतच नाही म्हणून समाधान येत नाही