आपले शहाणपण बाजूला ठेवून जाे संताला शरण जाताे ताेच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते, आणि शिष्यालाही जाे रामरूप पाहाताे, ताेच खरा गुरू. सद्गुरू कधीही मिंधेपणाने वागत नाही, आणि त्याला भीतीचा लवलेशही नसताे.आपला शिष्य काेणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते.देहबुद्धीचे लाेक विषयाचे दास असतात, पण संत मात्र विषयावर मालकी गाजवितात. संताजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले, किंवा त्याची आवड उत्पन्न झाली, म्हणजे संताची प्रचिती आली असे समजावे. औषध काय आहे हे न कळतासुद्धा राेग्याने ते श्रद्धेने घेतले तर त्याला गुण येताे, किंवा एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि ताे पाेटभर जेवू शकताे, त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल, पण शब्दाने त्याला ताे सांगता येईलच असे नाही.
मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख हाेत नाही, त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया, हाणामाऱ्या, सज्जनांचा छळ, संकटे, यांचे संतांना वाईट वाटत नाही. ‘वाईट वाटत नाही?’ याचा अर्थ ते त्यांना आवडते असा मात्र मुळीच नव्हे. पण मीठ जसे खारटच असणार, तशा जगात या घडामाेडी हाेणारच, जगाची राहाटीच अशी आहे, हे समजून ताे दुःख करणार नाही.किंबहुना, मीठ ार झाले तर खारटपणा जसा सहन हाेत नाही. तसे त्यालाही हाेईल. इतकेच नव्हे, तर त्याचा प्रयत्नही जगांतले वाईट कमी करण्याकडेच असताे.
विहिरींतल्या बेडकांना जशी समुद्राची कल्पना येत नाही, तशी आपल्याला संतांची कल्पना येत नाही. संत हे पहिल्याने आपल्यासारखेच हाेते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. आपल्याला संत ‘शाेधण्याची’ मुळीच जरुरी नाही. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शाेध करीत आपल्याकडे चालत येतील.
आपली भावना कशी आहे इकडे संताचे लक्ष असते.संत हा गुप्त पाेलिसासारखा आहे. ताे आपल्यामध्ये आपल्यासारखा राहताे, पण आपल्याला ओळखता येत नाही.संताला स्वतःच्या शरीरात काय चालले आहे ते सर्व दिसते, म्हणून ताे राेगाची काळजी करत नाही.
संताला कर्म मागेपुढे करता येते. पण ते टाळता येत नाही; ते कुणाला तरी भाेगलेच पाहिजे. संत जे साधन सांगतात ते आपल्या शक्तीप्रमाणेच असते. संत जाे बाेध सांगतात त्याचे आपण थाेडेतरी पालन करू या.ज्याला एका संताचे वर्म कळले त्याला बाकीच्या सगळ्यांचेही वर्म कळेल.