मनुष्यजन्माला येणे, संतांची भेट हाेणे, आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास हाेणे, या तिन्ही गाेष्टी ार दुर्घट आहेत. म्हणूनच संतसमागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. सर्व साधनांचा राजा म्हणजे सत्समागम हाेय. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात, मग मिळवायचे कुठे राहते? संताला मरण नसते.रडणारा चेला आणि मरणारा संत काय कामाचा? ज्याला पुनर्जन्म शील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते; पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणार नाही. आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला याेग्य असा सत्पुरुषाचा देह असताे.
भगवंताविषयीचे ज्ञान जसजसे वाढत जाईल तसतशी देहाची शक्ती वाढत जाते. देहाच्या आधाराने भाेगण्याची या जगामधली जी सुखे आहेत त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लाेक जास्त जाणताे. परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे, आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे, असे भगवंताचे सुख आहे; ते प्राप्त हाेण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. भगवंताच्या अस्तित्वाचे मूर्त स्वरूप म्हणजे संताची भक्ती हाेय. संत आपल्याला सत्यस्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने कायावाचामनाने जे कर्म केले जाते ते पाेरुषच हाेय.आगगाडीत बसणारी सर्व माणसे, मग ती काेणत्याही क्लासमध्ये बसणारी असाेत, इतकेच नव्हे तर बिनतिकिटाची माणसेदेखील, गाडीबराेबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पाेचतात;
त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पाेचतात. इतकेच नव्हे, तर त्यांच्यामधली बिनतिकिटाची, म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य, आणि अयाेग्य, अशी माणसेसुद्धा तरून जातात; मात्र काेणीही गाडी तेवढी साेडता कामा नये. हाच सत्संगतीचा महिमा. अद्वयता ही सत्संगतीनेच प्राप्त हाेते.परमार्थ साधण्यासाठी सत्संगती ार उपयाेगी पडते. ही संगती तीन प्रकारची असते; एक, संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास; दाेन, संताने सांगितलेल्या मंत्राचा सहवास; आणि तीन, संतांच्या विचारांची संगत.संगतीचा परिणाम जितका नकळत हाेताे, तितका कृतीचा हाेत नाही. सत्संगती धरावी. आपण ज्याकरिता जन्माला आलाे ते कारण फक्त संतच उमगले; म्हणून त्यांना शरण जाऊन त्यांची आरती करावी. संत स्वतःसमाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत !