संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहताे

    16-Feb-2023
Total Views |
 

gondavlekar 
प्रत्येकजण भक्ती करीतच असताे. कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड.सर्वांना विषयाची आवड असते.तेव्हा सर्व लाेक एकपरीने विषयाची भक्तीच करीत असतात.परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून, देहबुद्धी वाढवणारी, आणि स्वार्थी असते. ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड, म्हणजे भक्ती, उपजणे शक्य नाही. याकरिता भक्तिमार्गांतली पहिली पायरी म्हटली म्हणजे माेबदल्यारहित, निष्काम, निःस्वार्थी परम ात्मस्मरण करणे; आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे, देहबुद्धी विगलित हाेणे. देहरक्षण परमत्याप्राप्तीकरिता करावे. केवळ विषयसेवनाकरिताच जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट? जयंत्यादी उत्सव आपण करताे ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून.
मुळात प्रेम नसले तर, ज्याच्यावर प्रेम असते त्याला आपण जाे उपचार करताे ताे उपचार करून प्रेम आणायचे असते. प्रेम आणि उपचार यांचा अन्याेन्य संबंध असताे.या उपचाराने भगवंताशी संबंध वाढताे आणि त्यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते. आईआपल्यालहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते; उलट थाेडे दुःखच वाटते. पण त्यामुळे त्या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते. भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर स्वतःकरिताच हाेय.वास्तविक भगवंताला काय कमी आहे? संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवातसुद्धा विषय पाहताे. रामाची मूर्ती काय उत्तम घडविली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे, वगैरे आम्ही म्हणताे. आमची वृत्ती विषयाकार बनली.
म्हणून आम्हाला जिकडेतिकडे विषयच दिसताे.संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसताे. तेरा काेटी जप केला म्हणजे रामदर्शन हाेते असे म्हणतात. त्याचा अर्थ, तेरा काेटी जप व्हायला राेज दहाबारा तास या प्रमाणात जवळजवळ बरा वर्षे लागतात; इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच ताे हाेताे.नाम कधीच वाया जात नाही.केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन हाेत नाही, तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असेल असे समजावे; मग ते विषयप्राप्तीकरिता असेल, किंवा त्याचे पूर्वपाप घटत असेल. विषयाकरिता नाम खर्च करू नये.नामाकरिता नाम घ्यावे. नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे.