संतांचे ज्ञानच असे असते की, त्यांना वेदांताचे मर्म आपाेआप कळते. अमुक एक ग्रंथ कुणी लिहिला, केव्हा लिहिला, कुठे लिहिला, त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे, या गाेष्टी एक वेळ संतांना सांगता येणार नाहीत, पण त्या विषयाचे मर्म त्यांना बराेबर ठाऊक असते.आपण पाेथीतले नुसते शब्द तेवढे वाचताे; त्यांचा अर्थ संतांच्या कृपेवाचून कळणे कठीण आहे. बापाचा निराेप लहान मूल आईला आपल्या बाेबड्या शब्दांत आणि स्वतःला कळला असेल तसा सांगत असते; तितपतच पाेथीतल्या शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल.संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण, ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा. संतांच्या वचनाचा ओढूनताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा.
ग्रंथ वाचीत असताना आपली मते बाजूला ठेवावीत. एका अक्षरावर दुसरे अक्षर लिहिले तर पहिले दिसत नाही आणि समजत नाही, म्हणून शुद्ध मनाने ग्रंथ वाचा. आपल्या वडिलांचे पत्र जर आपल्याला आले तर आपण त्यातले अक्षर अनअक्षर वाचताे. तसे, ज्ञानेश्वरी, दासबाेध, हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत. खरे म्हणजे, संतांचे गं्रथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शाेधून काढून तेवढे करणारे लाेक थाेडेच असतात. ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लाेक त्यापेक्षा जास्त असतात; ‘माेठ्या संताचा ग्रंथ आहे.’ म्हणून नुसता वाचणारे लाेक त्याहून जास्त असतात; आणि त्याहीपेक्षा, ते गं्रथ मुळीच न वाचणारे लाेक ारच जास्त असतात! जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळ शिकायचे असते. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृति असते.
ते देहाला सावलीप्रमाणे मानतात. सावली दुःख झाले म्हणजे केव्हाही अयाेग्यच. म्हणूनच संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम हाेत नाही. संतांच्याकडे लाेक कितीतरी कष्ट करतात, आणि ते लाेक त्यांच्या नात्यागाेत्याचेही नसतात.संत त्यांना काही देत नसताना ते इतके कष्ट करतात, याचे कारण संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा हाेय. संत एकांतात जातात याचे कारण असे की, लाेकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात. लाेकांताता संतांची शांति बिघडते असे मुळीच नाही, पण एकांतात भेटणारे येत नाही, म्हणून ते एकांतात जातात.