गीतेच्या गाभाऱ्यात

    10-Dec-2023
Total Views |
 
 
पत्र पाचवे
 
bhagvatgita
गीतेची थाेरवी अशी आहे की, त्यात नुसते ज्ञान सांगितले नसून व्यवहार देखील सांगितला आहे. तत्त्वज्ञानरूपी पक्ष्याला दाेन पंख पाहिजेत. एक ज्ञानाचा व दुसरा व्यवहाराचा! एका पंखाने पक्षी आकाशात उडत नाही. त्याप्रमाणे नुसत्या ज्ञानाच्या पंखाने तत्त्वज्ञानरूपी पक्षी जीवनाच्या आकाशात उडू शकत नाही.तुला एक सूत्र पाहिजे आहे ते सूत्र तू आपल्या डायरीत टिपून ठेवणार आहेस; या बाबतीत खालील सूत्र तुझ्या डायरीत टिपून ठेव.महाभारतात निरनिराळ्या भागांचे निरनिराळे मणी आहेत.त्या सर्वांचा मेरूमणी म्हणजे गीताखंड!
 
हे गीताखंड ज्याला समजून घ्यावयाचे असेल त्याने असे लक्षात ठेवावे की, कर्माच्या दुधाने, भ्नतीच्या साखरेने आणि ज्ञानाच्या केशराने बनविलेले श्रीखंड म्हणजे गीताखंड! तू विचारतेस की, गीतेने ज्ञानयाेग सांगितला आहे व कर्मयाेग सांगितला आहे. हे दाेन्ही भिन्न आहेत का? श्रीकृष्णांना सांगावयाचे आहे की, ज्ञानयाेग काय किंवा कर्मयाेग काय-हे एकच आहेत. ज्याला कळले ताे शहाणा! (एकं सांख्यं च याेगं च य:पश्यति स पश्यति) गीतेचा सखाेल अभ्यास केला म्हणजे असे वाटू लागते की, नि:संग निष्काम व्हावे। अहंकाराते त्यजावे। कर्तव्यकर्म करावे। हेचि गीतामृत।। गीतेने कर्तव्यकर्म करण्यावर फार जाेर दिला आहे.ही कर्तव्यकर्माची तिवई तीन पायांवर अधिष्ठित आहे.
 
हे तीन पाय म्हणजे (1) नि:संगता (2) निष्कामता (3) निरहंकारिता.तू म्हणतेस की, ज्ञानाेत्तर कर्म नाही याचा अर्थ काय? लाैकिक अर्थाने विचार केला तर मनुष्याला मरेपर्यन्त कर्म सुटत नाही. नि:संगता, निष्कामता व निरहंकारिता हे तीन गुण प्राप्त झाले म्हणजे आपण जे कर्म करताे तेदेखील अकर्म हाेते.ज्ञानयाेग किंवा कर्मयाेग काय त्यामध्ये वरील तीन गुण नितांत आवश्यक आहेत. म्हणून गाेपाळकृष्ण म्हणतात की, ज्ञानयाेग काय किंवा कर्मयाेग काय, हे दाेन्ही एकच आहेत हे ज्याला कळले ताे शहाणा! गीतेने ज्ञान, कर्म, भ्नती यांचा समन्वय केला आहे.कर्माची जूट, ज्ञानाची लूट आणि भ्नतीची मूठ म्हणजेच गीतेची शिकवण अतूट!
 
अहंकाराला निराेप देऊन, आस्नतीला रामराम ठाेकून काहीही न मागता कर्तव्यकर्माची पुष्पे तू देवावर वाहा म्हणजे देव तुझा दास हाेईल.‘‘न मागे तयाची, रमा हाेय दासी’’ हा जीवनाचा महान संदेश आहे.तू अंतरंगातील दिव्य श्नतीची ओळख करून घे म्हणजे तुझ्या हृदयात आनंदाची बाग फुलेल, गुलाबाचा सुगंध दरवळेल, नेवाळीची फुले लाजून चूर हाेतील, जाई-जुई आल्हाद देतील. प्राज्नताच्या झाडाखाली सुगंधी फुलांचा सडा पडेल, चाफ्याचा घमघमाट येईल आणि अशा वेळी गळ्यात तुळशीमाळ घातलेली, हातात कमळ घेतलेली देवाची मूर्ती तुझ्या मनश्चक्षूपुढे येईल अन् तू म्हणशील: ‘‘अजि म्या ब्रह्म पाहिले.’’