आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे आणि ते मिळण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हाला लाभणे जरूर आहे; ते प्रेम आपल्याला मिळेल याचा आपण विचार करू.वास्तविक, आईचे तिच्या मुलावरचे प्रेम स्वाभाविक असते, तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकविण्याची जरूरी नसते; त्याप्रमाणे भगवंतावर आपले प्रेम असणे जरूर आहे. मनुष्यजन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, पण मनुष्यदेह निर्माण केल्यावर त्याला ार आनंद झाला. त्याला वाटले, खराेखर या याेनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझे प्रेम मिळविता येऊन मला ओळखता येईल. असे असताना मनुष्यप्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरे असू नये? मनुष्यप्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असताे;
मग या धडपडीतून भगवंताचे प्रेम त्याला का बरे येऊ नये? मला वाटते, ज्या ध्येयासाठी आपण धडपडत असताे ते ध्येय ठरविताना आम्ही चुकत असलाे पाहिजे खास. आमचे ध्येय असे असले पाहिजे की, त्यातून आम्हाला शाश्वत आनंद मिळविता आला पाहिजे. ताे आनंद जर एवढ्या कष्टाने, मेहनतीनेसुद्धा आम्हाला मिळत नसेल, तर आमचे ध्येयच चुकले असे म्हणायला काेणती अडचण आहे तुम्ही सांगा! आज प्रपंच आम्हाला हवाहवासा वाटताे, प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गाेष्टी आम्हाला सुख देतील असे वाटत असते, आणि त्या मिळविण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असताे. वस्तूसाठी चाललेली आमची धडपड ही खरे पाहता त्या वस्तूसाठी नसून, त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने, त्या आनंदासाठी, आम्हाला ती वस्तू हवी असते.
आज प्रपंचात मला समाधान मिळेल असे वाटते; ती माझी कल्पना नाहीशी हाेणे जरूर आहे. ही प्रपंचाची आस जाेपर्यंत आहे ताेवर भगवंताचे दास आम्हाला हाेता येणार नाही, आणि शाश्वत समाधान आम्हाला मिळणार नाही. ‘तू जगाची आस साेडून दे, मी तुला शाश्वत आनंद देताे,’ असे भगवंत आम्हाला सांगत आहे.ही जगाची आस, हे प्रपंचाचे प्रेम, आम्हाला कसे सुटेल? प्रपंच साेडल्याशिवाय भगवंताचे प्रेम आम्हाला येणारच नाही का? प्रपंच साेडून देण्याची आज आमची तयारी नाही. ताे न साेडता भगवंताचे कसे हाेता येईल, यासाठी संतांनी मार्ग सांगितला आहे; त्या मार्गाने आम्ही जाणे जरूर आहे. भगवंताला अशी प्रार्थना करावी की, ‘देवा! प्रारब्धाने आलेले भाेग येऊ देत, तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकाेस. दिवा जळायला हवा असेल, तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे. तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे.