जगात दाेन प्रकारचे राेग माणसाला नेहमी सतावत असतात.एक राेग असा, की त्याने भूकच लागत नाही. कितीही औषधपाणी करा, काही उपयाेग हाेत नाही.अशा माणसाला पंचपक्वान्नाचे जेवण तयार असूनही काय ायदा? ताे म्हणताे, ‘खायला खूप आहे, परंतु मला भूकच नाही, त्याला काय करू?’ दुसरा राेग असा की, कितीही खाल्ले तरी खाण्याची हाव काही पुरी हाेत नाही. काहीही खा, त्याचे भस्म हाेते.तद्वत् आपले आहे. मात्र, आपल्याला एकच राेग नसून दाेन्ही राेग आहेत. इतका परमार्थाचा हाट भरला आहे, भजनपूजन चालू आहे, परंतु आपल्याला त्याचे प्रेम नाही, त्याची आवडच वाटत नाही; आपल्याला त्याची खरी भूकच लागलेली नाही.
उलटपक्षी, भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा खराेखर कितीतरी जास्त दिले. बायकाे, मुले, नाेकरीधंदा, घरदार, इत्यादी कितीतरी गाेष्टी, की ज्यांपासून सुख मिळेल असे आपल्याला वाटते, त्या गाेष्टी पुरविल्या, पण अजून आपली हाव या सर्वांना पुरून, या सर्वाचे भस्म करून, कायमच आहे आणि परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. हे असे किती दिवस चालणार? आपण नीतिधर्माने चालताे, वागणूक वाईट नाही, हे खरे; पण याचे कारण, वाईट वागलाे तर आपल्याला लाेक नावे ठेवतील ही भीती! असा हा दिखाऊ चांगुलपणा, ही वरवरची सुधारणा, काय कामाची? मानवी जीवन सुखी झाले, तर ती सुधारणा म्हणायची! उलट आजची स्थिती पाहावी, तर ‘सुधारणा’ जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झाला आहे. आपण दरवर्षी वारी करताे, आणि जन्मभर करीतच राहणार, पण परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गाेष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काही ायदा नाही.
तीर्थयात्रा, पूजा, भजन ही परमार्थाची नुसती आठवण देतील, पण अंतरंग सुधारेल असे नाही आणि अंतरंग सुधारले नाही, तर बाकीच्याचा उपयाेग नाही.मनुष्याला किती ‘असले’ म्हणजे पुरे हाेईल हे ठरलेले नाही; आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानले, की जे आहे ते पुरेल. परमार्थ ‘समजून’ जाे त्याचे आचरण करील, त्याला ताे लवकर साधेल. अशा माणसाला प्रपंच साेडून जाण्याचे कारण उरणार नाही.मनात भगवंताचे प्रेम नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्यांची पूजाअर्चा करावी आणि त्याचे नामस्मरण करावे.पहिल्याने स्मरण बळजबरीने करावे लागेल, पण सवयीने ते ताेंडात बसेल. याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल. ‘मी पूर्वीचा नाही, आता मी भगवंताचा आहे’, असे वाटणे जरूरीचे आहे.