सुख मिळवण्यासाठी प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवा

    18-Jan-2023
Total Views |
 
 

Gondavalekar 
 
तुम्ही इथे इतकेजण जमला आहात, त्यापैकी कुणीही मला सांगावे की, आपली सर्व धडपड कशाकरिता असते? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असताे.प्रपंचात सुख मिळावे असे सर्वाना वाटत असते आणि त्याकरिता जाे ताे प्रयत्न करीत असताे. परंतु आजपर्यत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे? ज्याला मिळाले असेल त्याने तसे सांगावे. कुणी म्हणताे, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही; कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडताे; कुणी काही, कुणी काही, सांगतच असताे, आणि म्हणताे की, माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी सुखी हाेईन; पण ती इच्छा तृप्त झाल्यावर दुसरी तयारच असते; म्हणजेच आपली लाेभाची हाव कधीच तृप्त हाेणे शक्य नाही.
 
मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का? प्रपंचच जिथे खाेटा तिथे सुख कसले मागता? त्याचा अर्थ असा नाही की, प्रपंच साेडावा; पण ताे सुखाचा कसा हाेईल हे पाहात जावे. मी तुम्हाला खात्रीने सांगताे की, प्रपंच माझा नाही, ताे रामाचा आहे,’ असे म्हणा म्हणजे झाले. हे दिसण्यात साेपे आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे; ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायचे नाही. याकरिता रामाला अनन्यभावाने शरण जावे म्हणजे त्याची कृपा हाेईल. त्याच्या कृपेला तुम्ही देहबुद्धीचा बंधारा घालू नका. सर्व विसरून भगवंताला आळवावे. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे. ती काम करीतच असते, आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये.
 
आपण भगवंताला म्हणावे, ‘भगवंता, मी सर्वस्वी तुझा आहे. माझा प्रपंच हा तुझाच इसीक. तुझी भक्ती कशी करावी हे मला माहीत नाही, तू मला मार्ग दाखव. तू जे करशील त्यात मी सामील हाेईल.’ अशी अगदी मनापासून प्रार्थना करावी.मग ताे ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात रहावे. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण रिकामे परत जाता हे पाहून मला वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते तुम्हांला व्यावहारिक जगात कुठेही मिळायचे नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम. जे संतानी सांगितले आहे तेच मी सांगताे; ते सत्य आहे असे मनापासून समजा, राम तुम्हांला सुखी करील. तुम्हांला माझा आशीर्वाद आहे की तुम्हांला नामाचे म्हणजे भगवंताचे प्रेम खात्रीने लागेल. सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा.