भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान हाेय. परमात्मा हा आनंदरूप आहे. सत्य ही आनंदाची खूणच आहे. प्रत्येक गाेष्टीत मनुष्य आनंद पाहात असताे. उकाड्यात वारा आला, त्याला वाटते बरे झाले. पाऊस आला की, त्याला वाटते आता गारवा येईल. काेणत्याही तऱ्हेने काय, मनुष्य आनंद साठवू पाहात असताे. मनुष्याला भूक लागल्यावर ताे जर अन्न खाईल, तर त्याचे पाेट भरे ल आणि त्यापासून त्याला आनंद हाेईल. परंतु त्याने विष खाल्ले, तर त्याने आनंद न हाेता मरण मात्र येईल. तसे आपले हाेते. आपण विषयातून आनंद घेऊ पाहताे, आणि ताे बाधक हाेताे.एखाद्या राेग्याला जर जंत झाले आणि त्याला जर खूप खायला घातले, तर ते शरीराला पाेषक न हाेता, जंतच वाढतात. त्याचप्रमाणे आपण सत्कर्मे करताना पाेटात विषयांचे प्रेम ठेवून ती केली, तर त्यामुळे विषयच पाेसला जाऊन त्यापासून त्याला समाधान लाभू शकत नाही.याकरिता कर्तव्यबुद्धीने कर्म करावे, म्हणजे ते बाधक ठरत नाही. मनुष्य जन्मभर जाे धंदा करताे त्याच्याशीच ताे तद्रूप हाेऊन जाताे. एखादा वकील घ्या, ताे त्याच्या धंद्याशी इतका तद्रूप हाेताे की, मरतेवेळीसुद्धा ताे वादच करीत जाईल.
नाेकरी करणारा नाेकरीशी इतका तद्रूप हाेताे की, स्वप्नातदेखील ताे स्वत:ला नाेकर समजूनच राहताे.कर्म कसे करावे, तर त्याच्यातून वेगळे राहून.लग्नाचा साेहळा भाेगावा, लाडू खावेत, परंतु ते दुसऱ्याचे आहेत असे समजून, आपल्या मुलीचे किंवा मुलाचे नाहीत असे मानून, नाहीतर व्याह्यांची काळजी लागायची, किंवा हुंडा मिळताे की नाही इकडे लक्ष लागायचे. त्यामुळे तापच निर्माण हाेईल. कर्माशिवाय काेणालाच राहता येत नाही. एखाद्याला शिक्षा द्यायची म्हणून ‘अगदी हलायचे नाही. पापणी, हात, पाय, काहीही हलवता कामा नये,’ असे सांगितले, तर ते जसे त्याला शक्य हाेणार नाही; तसे काही ना काही तरी कर्म हे हाेणारच. भगवंतांनी अशी काही सांगड घालून दिली आहे की, कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही. परंतु ती कर्मे ‘राम कर्ता’ ही भावना विसरून केली, तर बाधक हाेतात आणि मरणापर्यंत माणूस पुढल्या जन्माची तयारी करीत राहताे. तेव्हा देहाने कर्म करतानाही ‘कर्ता मी नव्हे’ हे जाणून कर्म करावे. प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे, पण मनात मात्र ‘मी रामाचा आहे’ ही अखंड आठवण ठेवावी, म्हणजेच त्याच्या नामात राहावे.