नामस्मरणरूपी शेताची सदाचरणातून मशागत

    23-Dec-2022
Total Views |
 
 

Gondavelakr
 
नामस्मरणरूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमत: सदाचरणाची आवश्यकता आहे. सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरिता लागणाऱ्या कुंपणासारखे आहे, म्हणून त्याचे महत्त्व आहे. दुसरी गाेष्ट, शुद्ध अंत:करण. शुद्ध अंत:करण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन.या जमिनीमधले दगड, हराळी, वगैरे काढून ती साफ करावी, म्हणजेच, अंत:करणात काेणाबद्दलही द्वेष, मत्सर, वगैरे ठेवू नये. शुद्ध अंत:करणानंतर नामस्मरणाचे महत्त्व आहे. नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचे बी आहे. हे बी किडके नसावे, म्हणजे नाम सकाम नसावे. उत्तम बी म्हणजे ‘नामाकरिताच नाम’ हे आहे. त्यानंतर तीर्थयात्रा, संतांचे आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी याची आवश्यकता आहे.या सर्व गाेष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत. यामुळे शेत चांगले यायला मदत हाेते. शेवटची महत्त्वाची गाेष्ट म्हणजे भगवत्कृपा हाेय.भगवत्कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे.
 
पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गाेष्ट काही और आहे. पण ताे पडणे न पडणे आपल्या हाती नाही. शेताला लावण्याकरिता पाटाचे पाणी एखादी विहीर, तलाव किंवा नदी यामधून नेता येता येणे शक्य असते, परंतु पावसाच्या बाबतीत काेणाला काहीच करता येत नाही. त्यामुळे एखाद्याने, आताच सांगितल्याप्रमाणे शेताची उत्तम निगा राखली, उत्तम बी पेरले, तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असताे. नामस्मरणरूपी शेताचे एक वैशिष्ट्य आहे.म्हणून हे शेत भगवत्कृपारूपी पाऊस खेचून घेऊन स्वत:वर पाडते, त्यामुळे पावसाच्या अभावी शेत वाया गेले असे कधीच हाेत नाही. आपण असे पाहू की, दाेन शेतकरी आहेत. एक कर्तव्यकर्म म्हणून वेळ झाली की, आपल्या शेताची मशागत करणारा आहे. तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणारा आहे. आता जेव्हा पाऊस पडेल, तेव्हा ज्याने मशागत केली त्याचे शेत उत्तम वाढेल, पण दुसऱ्याचे वाढणार नाही.
 
भगवंताच्या कृपेने जाे पाऊस पडणार, त्याचा एकाला ायदा मिळेल, ताे दुसऱ्याला मिळणार नाही. म्हणजे जाे नियम प्रपंचात लागू ताेच नियम परमार्थात लागू. भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते. ज्याने या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल, त्या प्रमाणात त्याला ायदा हाेईल, दुसऱ्याला नाही हाेणार.भगवंत किंवा संत समदृष्टी असतात ते असे.भगवंत नि:पक्षपाती आहे. त्याच्यापाशी काेणताही भेद नाही. आपण तयार झालाे की, त्याची कृपा आपाेआप हाेते. कृपेला याेग्य अशी भावना तयार करणे आपले काम आहे. संतांनी नुसते आपल्याला सांगून भागत नाही, आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वत: करायला पाहीजे. त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली, तर तिचा उगम आपल्यातच आहे, हेच यावरून दिसते.