निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणाेपासनेत राहावे

    04-Nov-2022
Total Views |
 
 

Gondavelakr 
 
समजा, आपल्याला एका गावाला जायचे आहे. त्या गावाला जाणारी आगगाडी ही पहिल्याने खरी धरून आपण तिची संगती करताे. आपले गाव आले की आपण गाडी साेडताे.हे जसे खरे, त्याचप्रमाणे, निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच खरे मानून त्याची संगती केली पाहिजे.निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही ही गाेष्ट खरी, पण सगुण खरे धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पाेचता येणार नाही हेही तितकेच खरे. सगुणाेपासनेत स्वत:चा विसर पडला की, एकीकडे ‘मी’ नाहीसा हाेताे आणि दुसरीकडे देव नाहीसा हाेताे, आणि शेवटी परमात्मा शिल्लक उरताे.परंतु ताप आलेल्या माणसाला ज्याप्रमाणे सर्व कडूच लागते, त्याप्रमाणे आमची वृत्ती विषयाकार झालेली, तिला सगुण निर्गुण, दाेन्ही कुठे गाेड लागतात ? म्हणूनच, आपण निर्गुणाची ओळख करून घेऊन सगुणात राहावे.
 
स्वत:चा विसर जर रामाच्या पूजनात पडू लागला तर निर्गुण आणखी काेणते दुसरे राहिले ? ‘सगुणाशिवाय निर्गुण उपासना करताे’ म्हणताे त्याला त्याचे मर्मच नाही कळले. वस्तुत: ताे सगुण उपासनाच करीत असताे, पण त्याचे त्यालाच नाही कळत. स्थलात आणि कालात जे देवाला आणतात त्यांनी त्याला सगुणात नाही आणले या म्हणण्यात काय अर्थ आहे ? परमार्थाविषयी आपल्या काही विचित्र कल्पना असतात. अगदी अडाणीपणा पत्करला, पण हे विपरीत ज्ञान नकाे. सूर्य हा आपल्या आधी हाेता, आज आहे, आणि पुढेही राहणार आहे.ताे नेहमीचाच असल्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्या ध्यानात येत नाही, भगवंताच्या बाबतीत आपले तसेच घडते. एखादा नास्तिक जर म्हणाला की, ‘देव नाहीच; ताे कुठे आहे हे दाखवा,’ तर त्याला असे उत्तर देऊन अडविता येईल की, ‘देव कुठे नाही ते दाखवा.’ पण हा उत्तम मार्ग नव्हे.
 
देव नाही असे म्हणणारालासुद्धा, त्या स्वरूपाचे काहीतरी आहे ही जाणीव असतेच; फक्त ताे त्याला निरनिराळी नावे देताे.निसर्ग, शक्ती, सत्ता, अशी नावे देऊन ताे त्यांचे अस्तित्व मान्य करताे, पण ‘देव’ नाही असे ताे म्हणताे. जे आहे असे त्याला वाटते ताेच देव समजावा. खराेखर, मनुष्याला जितके ज्ञान असते तितके लिहिता येत नाही; जितके लिहिलेले असते तितके वाचणाऱ्याला समजत नाही; त्याला जितके समजलेले असते तितके सांगता येत नाही; आणि ऐकणाऱ्याला, ताे जितके सांगताे तितके कळत नाही. म्हणून मूळ वस्तूचे वर्णन स्वत: अनुभव घेऊनच समजावे. परमात्मा कर्ता आहे असे समजून आपण आजचे कर्तव्य करीत राहावे.साधन व वाचन असले की साधक कधी मागे पडायचा नाही.