भगवंताशी नाते जाेडावे

    03-Nov-2022
Total Views |
 

Gondavleakr 
 
भगवंताचे नाम मुखातून न येण्यापेक्षा मुकेपण बरे नाही का? दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहात नसेल तर दृष्टी काय कामाची? आपले कान त्याची कीर्ती जर ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे? डाेळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणे, मुखाने भगवंताचे नामस्मरण करणे, कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणे, हाच खरा अभ्यास आहे. भगवच्चरित्र ऐकायचे कशासाठी? तर त्याप्रमाणे वागण्यासाठी.
भगवत्प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे : भगवंताशी आपले नाते जाेडावे, काेणते तरी नाते लावावे. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे; ताे माता, मी लेकरू; ताे पिता, मी पुत्र; ताे पती, मी पत्नी; ताे पुत्र, मी आई; ताे सूत्रधार, मी बाहुले; असे नाते लावावे. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावताे की नाही? लग्न हाेण्यापूर्वी काेण नवरा आणि काेण बायकाे? पण लग्न हाेताच ते नाते लावताे, आणि सहवासाने प्रेम वाढविताे.
 
प्रेम केल्याने प्रेम वाढते. तसे भगवंताविषयी प्रेम काेणचे तरी नाते लावून वाढवावे, किंबहुना ताे स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत्प्राप्ती सुलभ हाेते.हनुमंताने दास्यभक्ती केली, रामाला आपल्या हृदयातच ठेवले. गूहकाचे रामावर प्रेम तसेच हाेते. रावणाने शत्रू म्हणून, भरताने भाऊ म्हणून, सीतामाईने पती म्हणून, बिभीषणाने मित्र म्हणून, हनुमंताने स्वामी म्हणून, भगवंताला आपलासा करून घेतलाच.ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहूच नये. मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा. घरात देवाची उपासना करावी. आपण घरी जे अन्न खाताे ते देखील परान्नच आहे, कारण अन्नदाता परमात्माच आहे. त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्त्विक आहार हाेय. मुख्य म्हणजे, प्रत्येक गाेष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे; मग ते खाणे, पिणे, गाणे, बजावणे, हिंडणे, काहीही असाे.
 
गायन हे करमणुकीकरिता असले तरी भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डाेळ्यात पाणी यावे. राम आपल्या जरुरीपुरते कुठेही देताे, म्हणून भगवंत देईल त्यात समाधानाने राहायला शिकावे.भांडण आपापसांतच मिटविण्याचा प्रयत्न करावा, शक्य ताे काेर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊ नये.प्रपंचात दु:खप्रसंग आले म्हणजे मग रामस्मरण हाेते; तसे ते सर्व काळी करावे. रामावर श्रद्धा पूर्ण असावी, म्हणजे आपली काळजी त्याला वाटते. भगवंताच्या नामात राहिल्यावर भगवंताला आपलेसे करून घ्यायला निराळे काही करण्याची जरुरी नसते.