जगात आजपर्यंत पुष्कळ लाेकांनी दानधर्म, स्वार्थत्याग केला, पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना नि:स्वार्थी बनता आले नाही. खरे म्हणजे आमचे मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला नि:स्वार्थी बनता येणार नाही. मन काेणत्या साधनाने आम्हाला आवरता येईल? याेग, याग, इत्यादी साधने त्यासाठीच सांगितली आहेत, पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का? ह्या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहताे त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही. मला वाटते, मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही; कारण आज एक नामच भगवंताने अवताररूपाने आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे.
तेव्हा, मन स्वाधीन हाेण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या.नाम घेत असताना मनाaचे स्थैर्य बिघडविणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न करा. मनाला सर्वांत माेठा विकार काेणता बाधत असेल तर ताे म्हणजे अभिमान. ताे अभिमान साेडायला आपण शिकले पाहिजे. भगवंताने आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच हाेते. हिरण्यकश्यपूच्या वेळी भगवंताने अवतार घेतला, पण देव समाेर उभे असतानासुद्धा त्याचा हात नमस्काराकडे न जाता तलवारीकडे गेला! यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना येईल. ताे अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव साेडून नाम घेतले पाहिजे.
मनाची स्थिरता बिघडवणारा दुसरा शत्रू म्हणजे राग. माेठ-माेठ्या तपस्वी लाेकांची तपश्चर्या याने धुळीस मिळविली आहे. हा राग आवरण्यासाठी, आपल्याला राग कशामुळे येताे हे नीट समजून घेतले पाहिजे. व्यवहारात आपल्याला नीतीची बंधने घालून दिली आहेत, ती सर्व आपण पाळली पाहिजेत. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपाेआप आवरले जातील. ही बंधने कशासाठी घातली आहेत याचे मर्म समजून घेऊन वागले तर राग आवरता येईल, आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पाेटात लपून बसलेले काम, लाेभ, माेह, इत्यादी विकारांनाही पायबंद पडेल. याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपले मन भगवंताकडे विनम्र करा; भगवंताकडे जाऊ लागा, मन आपाेआप तुमच्या मागे येईल. कारण ताे त्याचा धर्म आहे. भगवंताला विसरू नका. तुमचे मन तुम्हाला आपण हाेऊन साहाय्य करील याची खात्री बाळगा.