भगवंताचे स्मरण करणे हेच प्रत्येक साधनाचे मर्म हाेय

    26-Nov-2022
Total Views |

gondavelakr
एका गावाहून दाेन सरकारी बैलगाड्या निघाल्या. एका बैलगाडीत साेन्याची नाणी असलेल्या पिशव्या हाेत्या, व दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड हाेते.सबंध दिवसभर प्रवास केल्यावर त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पाेहाेचल्यावर गाडीवानांनी गाड्या साेडल्या, आणि दाेन्ही गाड्यांच्या बैलांना कडबाच घातला तसे, भगवंताच्या दृष्टीने, विद्वान आणि अडाणी दाेघेही सारखेच. सुंदर विचारांचा भार डाेक्यात वागवला म्हणजे विद्वानाला भगवंत जवळ हाेताे असे मुळीच नव्हे.विद्वान् काय किंवा अडाणी काय, दाेघांनाही बुडविण्याइतका अभिमान जवळ असताे; विद्वानाला अभिमान जास्त मारक, इतकेच. विद्येला जगात किंमत आहे, पण ती साधनरूप आहे, साध्यरूप नाही. विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे.
 
पुष्कळ वेळा विद्वान् लाेक आपल्या आयुष्याचा व्यर्थ चिकित्सेने नाश करून घेतात. साधेभाेळे अडाणी लाेक भगवंताचे नाम घेऊन मजेने तरून जातात, पण हे विद्वान् लाेक, भगवंत कसा आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचे नाम त्याच्यापर्यंत पाेहाेचते की नाही, नाम काेणत्या वाणीन घ्यावे, इत्यादी गाेष्टींची चिकित्सा करीत बसतात; पण ती इतकी करतात की, शेवटी आयुष्याचा अंतकाल येताे, व नामाची चिकित्सा तेवढी पदरांत पडते, नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. म्हणून शहाण्या विद्वानाने चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी.प्रत्येक भक्ताने साधनाचे कष्ट स्वत:च साेसले पाहिजेत. कितीही माेठा गुरू असला तरी त्या बाबतीत ताे काही करू शकत नाही; ार तर त्या कष्टांची त्याला जाणीव हाेऊ देणार नाही. आपले मन आपणच आवरले पाहिजे. आपल्या वृत्तीला आपणच वळविले पाहिजे. साधन करीत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे साेसल्याच पाहिजेत.
 
भगवंताकडे जायची साधने पुष्कळ आहेत; इतर साधनांचे कष्ट करून जे साधते तेच नाम घेतल्याने साधते, पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण हाेय. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. समजा आज आपल्या हातून चूक झाली. अगदी जाणतेपणाने झाली - तरी आपण जर पश्चात्ताप पावून भगवंताला शरण गेलाे तर खात्रीने ताे क्षमा करताे. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.