देव अत्यंत मायाळू आहे

    31-Oct-2022
Total Views |
 
 

Gondavelakr 
 
तुम्ही ार कष्ट करून इथे येता, किती दगदग, किती त्रास तुम्हाला साेसावा लागताे! बरे, इथे आल्यावर हाल काय कमी हाेतात? परंतु इथे कशासाठी आपण येताे, आपल्याला काय हवे आहे, हे आपल्याला कळते का? आपल्याला देव खराेखरच हवासा वाटताे का? याचा विचारच आपण ारसा करीत नाही. आपल्यावर काही संकट आले, किंबहुना आपले काही वाईट झाले, की आपण म्हणताे, देवाने असे कसे केले? असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही. देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एकवेळ परवडला, कारण ताे ‘देवाने वाईट केले’ असे तरी म्हणणार नाही. देव खराेखर अत्यंत मायाळू आहे, त्याला कुणाचेही दु:ख सहन हाेत नाही. काेणत्या आईला आपल्या मुलाला दु:ख-कष्ट झालेले आवडेल?
 
म्हणून, देवाने माझे वाईट केले ही खाेटी समजूत प्रथम मनातून काढून टाका. द्राैपदीला जेव्हा वस्त्रहरणासाठी दु:शासनाने भरसभेत खेचले, तेव्हा तिला वाटत हाेते की पांडवांना हे सहन हाेणार नाही, ते माझी विटंबना हाेऊ देणार नाहीत, ते दु:शासनाची खांडाेळी करतील. तिला पांडवांबद्दल विश्वास वाटत हाेता.दु:शासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले. धर्माला वाटले, आता विराेध केला तर आपले सत्याचे व्रत उघडे पडेल, म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली. तीच स्थिती इतर पांडवांची झाली. हे कसले अहंपणाने लडबडलेले सत्य! पुढे तिने भीष्माचार्यांकडे आशेने पाहिले, परंतु त्यांनीही मान खाली घातली. तेव्हा मात्र तिने जगाची आशा साेडली, आणि कळकळीने परमात्मा श्रीकृष्णाला हाक मारली, आणि त्याने अनेक वस्त्रे पुरवून तिची अब्रू रक्षण केली.
 
पुढे तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारले की, ‘आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही धावलास? ताे दुष्ट मला केस धरून खेचून नेत असतानाच का नाही धावलास?’ तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ‘त्यात माझा काय दाेष? मी तुझ्या रक्षणासाठी आतुर हाेताे, परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा हाेती, ते रक्षण करतील असे तुला वाटत हाेते; मला दरवाजा खुला नव्हता, मग मी कसा येऊ ? तू जगताची आशा साेडलीस आणि मला बाेलावलेस, त्याबराेबर मी तुझ्या भेटीला धावलाे.’ जगाची आशा, आसक्ती, साेडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पाेचेल? ज्या गाेष्टीवर आपले प्रेम असते. त्याच गाेष्टीची आपल्याला नड लागते. आपल्याला देवाची नड लागली आहे का? देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरुरी आहे, आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर ताे एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा, हेच माझे सांगणे.