ओशाे - गीता-दर्शन

    29-Oct-2022
Total Views |
 
 

Osho 
‘मी इंद्रियाच्या पलीकडे आहे’ हे जाणणारा निसर्गाच्याही पार हाेताे.इंद्रयास्नती शरीराला विकृत व्यवस्था देते. इंद्रियास्नती नसलेल्या व्य्नतीलाही भूक लागेलच, पण मी भूक शुद्ध असेल आणि गरज असेपर्यंतच ती भूक असेल. गरजा खूप कमी आणि वासनाच अनंत आहेत. गरजा फारच मर्यादित असतात. स्वादाला तर कधी शेवटच नसताे. जेवण तर फार थाेडेसेच पुरेसे असते आणि हे जीवनाच्या सर्वच पैलूंना तितकेच लागू आहे.मग सर्वच बाजूंनी फ्नत शुद्धतम गरजा तेवढ्या शिल्लक राहतील.काही गरजा अशा आहेत की ज्या व्य्नतीच्या गरजाच नाहीत. उदा. कामवासना. अशांतून ती व्य्नती मु्नत हाेऊन जाईल. जेवण ही आपल्या शरीराची गरज आहे हे निश्चित. पण कामवासना ही आपल्या शरीराची गरज अजिबात नाही. याचा आपण कधी विचार केलात का?
 
कामवासना ही समाजाची गरज आहे. आपण जेवण केले नाहीत, तर आपण मरून जाल. पण आपणास कामवासना राहिली नाही तर संतती निर्मिती खलास हाेईल.समाजाचा प्रवाह बंद हाेईल. बाकीचे बाॅयाॅलाॅजिकल आहे, जैविक. निसर्गाची जी गरज आहे ती तितकी आपली गरज नाही. आपण मरण्याआधी आपणाकडून कुणाला तरी निसर्ग जन्म देववील.ती निसर्गाची गरज आहे. जी व्य्नती आपण इंद्रियांच्या पार असल्याचे जाणून घेते, ती व्य्नती आपण निसर्गाच्या पार असल्याचेही जाणून घेते.ती व्य्नती निसर्गाच्या पाशातून आणि जाळ्यातून बाहेर पडते. मग जेवण तर चालूच राहील पण, कामवासना नाहीशी हाेईल. आपल्या गरजांमध्येही फरक आहे, हे मी सांगताे.ज्या व्य्नतीची इंद्रियास्नती संपून जाईल तिची भूक शुद्ध हाेऊन सीमित व नैसर्गिक अशी हाेऊन जाईल.