ओशाे - गीता-दर्शन

    19-Oct-2022
Total Views |
 
 
 

Osho 
इंद्रियासक्तीतून सुटण्यासाठी पहिले सूत्र समजून घेतले तरच सुटू शकाल. पाहिजे तर चेतना पदार्थाकडे आसक्त हाेऊ शकते.
जेव्हा एखादे इंद्रिय मागणी करते, जेव्हा एखादे इंद्रिय कुठलीही निवड करते, तेव्हा एखादे इंद्रिय तृप्तीसाठी आतूर हाेऊन धावते तेव्हाच, आपण हे इंद्रिय नाही आहाेत, या सत्याची ओळख हाेण्यासाठी काहीतरी करावे लागेल. जेव्हा आपण जेवण करता तेव्हा आपण इंद्रियचं हाेऊन जाता. त्यावेळी थाेडीशी जेवणाची आठवण ठेवली पाहिजे.खराेखरीच मी जेवण करताे काय? जेवत असताना आपण एकवेळ चमकून हे पाहिले पाहिजे की मी जेवत आहे काय? आत असा शाेध घ्यायला पाहिजे की मी जेवत आहे काय? जसाजसा शाेध घ्याल तसतसा एक फरक आपल्या लक्षात येईल. आपण जेवण करीतच नाही आहात, आपण जेवणापासून खूप लांब आहात.
 
शरीर जेवण घेते आहे. जेवण तर आपणाला स्पर्शही करत नाही. काेणताही पदार्थ चेतनेला स्पर्श करील तरी कसा? पण चेतना मात्र पाहिजे असेल तर पदार्थाकडे आसक्त हाेऊ शकते. पदार्थ तर शिवतही नाही पण पाहिजे तर चेतना मात्र पदार्थाकडे आकर्षित हाेऊ शकते. चेतना पाहिजे तर, स्वत: पदार्थाबाबत बंधनात असल्याचा अनुभव घेऊ शकते. चेतना आपण बंधनात असल्याचे मानू शकते.
जेव्हा जेवण चालू असते तेव्हा आपण म्हणताे, ‘मी जेवण करताे’ यात चूक थाेडीशीच आहे पण खाेलवरची आहे. जेव्हा भूक लागते तेव्हापासूनच ही चूक सुरू हाेते. तेव्हा आपण म्हणता की, ‘मला भूक लागली आहे.’