भगवंतापासून जाे निराळा राहात नाही ताे मुक्तच. मी भगवंताचा म्हटले की तिथे बद्धपणा संपला. ‘मी’ नसून ‘ताे’ आहे हे जाणणे म्हणजे मुक्तता प्राप्त करून घेणे. देहात असून देहातील राहताे ताे मुक्त. ‘राम कर्ता’ हे जाणताे ताे मुक्त. बद्धाचे आवरण काढून टाकले की आपण मुक्तच आहाेत. ‘माझे, माझे’असे म्हणून आपण बद्धावस्था लावून घेताे. माझ्या मनावर कशाचाही परिणाम झाला नाही आणि समाधान कायम राहीले, की मुक्तावस्था. ‘माझ्यासारखा पापी मीच’ असे आपण मनानेच ठरवताे आणि दु:ख करीत बसताे. मी एक भगवंताचा झालाे, आता नाही काेणाचा, असे म्हणावे, आणि जगात नटासारखे वागावे. वास्तविक आपण मायेकडून पछाडलाे गेलाे आहाेत. भगवंताजवळ माया ही आपल्या छायेप्रमाणे आहे. आपण मायेचा जाे नियंता भगवंत त्याचे हाेऊन राहावे. मग माया खरी नाही हे समजते.
मायेला ओळखणे म्हणजे विवेक. भगवंत ठेवील त्यात समाधान मानणे हे वैराग्य. पापपुण्य हे मनाचे धर्म आहेत.मी आता नाम घेताे, माझी सर्व पापे त्यामुळे नाहीशी झाली आहेत, अशी दृढ भावना झाली की ताे निष्पाप झाला म्हणून समजावे. चारचाैघे करतात म्हणून साधन करून नाही चालणार.साधनांत दृढ भाव पाहिजे. साधन करायचे ते याेग्य मार्गाने झाले पाहिजे. ते अगदी निष्काम असावे. बुद्धिभेद करणार लाेक जगात नेहमी असणारच; पण साधकाने आपला बुद्धिभेद हाेत नाही इकडे जागृत असावे. काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपला स्वत:चा असा काही प्रपंच राहिलेला नसताे तरीही हे लाेक उगीचच जगाचे दाेष काढीत बसतात, दुसऱ्यांच्या घरी जाऊन उठाठेव करतात; हे ार माेठे पाप आहे. साधकाने ते कटाक्षाने टाळावे.ज्या लाेकांना आपल्यामध्ये दाेष आहेत हे कळतच नाही ते लाेक अगदी खालचे समजावेत; ज्यांना आपला दाेष कळताे ते दुसऱ्या प्रतीचे समजावेत;
आपण प्रयत्न करूनसुद्धा भगवंताच्या आड येणारा दाेष जात नाही म्हणून तळमळ असणारे लाेक हे सर्वांत चांगले; साधकाने तसे बनले पाहिजे. परमार्थमार्गामध्ये अर्ध्यापर्यंत गेल्यावर मग पुढे जाणारे साधक ार थाेडे असतात. खरे म्हटले म्हणजे साधन आणि वाचन असले की साधक कधी मागे पडायचा नाही. ब्रह्मचारी साधकाने प्रपंचातल्या उठाठेवी करू नयेत, कारण तशाने प्रपंचाचे प्रेम त्याला लागेल. त्याने प्रपंचापासून चार पावले दूर राहावे, नाही तर ताेच हवा असे वाटू लागते.जगात किती पाेथ्या आणि किती मते आहेत! एवढे पाहायला वेळ कुठे आहे? म्हणून साधकाने गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, किंवा दासबाेध असा एक ग्रंथ प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावे. मुंगी डाेंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि कालांतराने का हाेईना पण वर पाेचल्याशिवाय राहात नाही, हे ध्यानात धरून आपण प्रयत्नाला लागू या